लातूर मनपाचा अजब कारभार, नागरिकांना ‘नळाचं’, तर कारभाऱ्यांना ‘मिनरल वॉटर’ मग पाण्यावर इतका खर्च का ? मनपाचे पाणी पिण्या योग्य नाही का ?
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. प्रशासक आणि सत्ताधारी छाती ठोकून सांगतात की, “महानगरपालिकेचे पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य आहे.” मात्र, हेच दावे पोकळ असल्याचे सिद्ध करणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कागदावर पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगणारे हेच कारभारी स्वतः मात्र…









