उदगीर शहरातील वाहतुक सिग्नलचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पन

महाराष्ट्र खाकी ( उदगीर ) – उदगीर शहरातील विस्कळीत वाहतुकीचा मुद्दा गेली अनेक वर्षे होता. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने शहरात वाहतुक सिग्नल बसविण्यात आले. त्या सिग्नलचे आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पन करण्यात आले. या सिग्नलमुळे उदगीर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतीचे ठरतील असे राज्यमंत्री संजय

बनसोडे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नगरपालिका मुख्याधिकारी शुभम क्यातमवर, अभियंता उदय इप्पिली, मंजूर खांन पठाण, समीर शेख, ज्ञानेश्वर पाटील इत्यादी उपस्थित होते.

उदगीर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उदगीर नगर परिषदे अंतर्गत सौर ऊर्जेवरील ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय या योजनेतून सिग्नल बसविण्यात आले आहेत. कॅप्टन चौक, शिवाजी चौक, पोलिस स्टेशन चौक व डॉ.झाकीर हुसैन चौक या ठिकाणी सिग्नल उभारण्यात आले आहेत. सदर सिग्नलचे उदघाटन छत्रपती शिवाजी

महाराज चौक येथे मा.ना. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उदगीर शहराच्या विकास कामाला वेग आला असून शहरातील वाढती वाहतूक, दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या त्या अनुषंगाने सातत्याने निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी, शहरातील नागरीकांची बऱ्याच दिवसापासुन सिग्नल बसवावे ही मागणी होती. नगर परिषद उदगीर तर्फे महाराष्ट्र सुवर्ण

जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजने अंतर्गत 50 लाख निधीतून सौर ऊर्जेतून ट्रॅफिक नगर परिषदेचे अंदाजे वीस हजार रुपयाची वीज बिलाची बचत होणार आहे व शहरातील रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीत अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे उदगीर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला वाहतुकीचा प्रश्न मार्गी निघेल असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

Recent Posts