विद्यार्थ्यांनी आपल्यातला न्यूनगंड काढून टाकला तर यश निश्चित मिळते – मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – पुणे येथे आय क्यू आर ए सिविल सर्विसेस अकॅडमी च्या वतीने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनार मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना 16 व्या लोकसभेतील उच्च शिक्षित तथा लातूरचे माजी लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड म्हणाले की, जोपर्यंत

विद्यार्थ्यांनी आपल्यातला न्यूनगंड काढून टाकणार नाहीत.तोपर्यंत त्यांना कसले ही यश मिळणार नाही. आपण पदवीच शिक्षण घेईपर्यंत पुढे काय करायचं हे ठरवत नाही. परंतु एखादी खेड्यातला विद्यार्थी यूपीएससी करायचा म्हणाला तर लोक त्याला वेड्यात काढतात. आणि हसतात. परंतु “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे”या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या बोली भाषेत

जर यूपीएससीची तयारी केली तर निश्चितपणे यश हे त्यांना मिळते असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुनील बळिराम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. देशभरातून या सेमिनारसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्न उत्तराच्या तासात आपआपले नाव आणि गाव सांगितल्यानंतर लक्षात आलं की विद्यार्थी हे रांची झारखंड, अयोध्या, उत्तर प्रदेश , उज्जैन मध्य प्रदेश ,

बंगलोर कर्नाटक, बुलढाणा महाराष्ट्र, लातूर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, बीड, कानपूर उत्तरप्रदेश, धारवाड कर्नाटक,गोवा,आंध्रप्रदेश, अशा वेगवेगळ्या राज्यातून आणि जिल्ह्यातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सेमिनारमध्ये जगप्रसिद्ध इतिहासाचे प्रोफेसर अवध ओझा यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झाले. त्यांनी आपल्या

मार्गदर्शनामध्ये अनेक पैलूचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी झाले पाहिजे आणि निराश न होता सतत अभ्यास करून सातत्य कसं ठेवलं पाहिजे याचा कानमंत्र त्यांनी दिला. या पुणे येथील ठेवलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या सेमिनार मध्ये नुकताच यूपीएससीमध्ये 202 रँकनी आयएएस केडर मिळालेला लातूरचा विद्यार्थी रामेश्वर सुधाकर सबनवाड यांनी यूपीएससी साठी केलेल्या

तयारीचा इत्यंभूत अशी माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या अनेक शंका असलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिले. आणि यूपीएससी ची तयारी कशी केली, आणि पहिल्या प्रयत्नात पास न झाल्याने निराश तर झालेलोच पण त्यातनं बाहेर पडून दुसऱ्या प्रयत्नातच देशांमध्ये 202 रँकनी आयएस केडर मिळवल्याबद्दल चा त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी समाधान

केलं. कार्यक्रमासाठी दिल्लीवरून सुप्रीम कोर्टातील वकील एडवोकेट सुधांशू हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन पुण्याचे फैजल यांनी केले होते.
देशभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळपास साडेचार तास हा सेमिनार चालला आणि विद्यार्थी एक नवीन ऊर्जा घेऊन गेले कार्यक्रमाची सांगता आभार व्यक्त करून झाले.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
12:38