वंचित नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद – खासदार सुधाकर शृंगारे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) –  केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. ज्या पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही, त्यांची या माध्यमातून नोंदणीही केली जात आहे. या यात्रेचा लाभ घेत वंचित नागरिकांनी शासकीय

योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सोनानगर येथे रविवारी विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे बोलत होते देविदास काळे, ॲड. गणेश गोमचाळे, अमोल गिते, बालाजी मारखडे, दुर्गेश चव्हाण, डॉ .बोरगावकर

आदी यावेळी उपस्थित होते. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून दीनदयाळ  अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्ज्वला योजना, आधारकार्ड तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. सर्व पात्र नागरिकांनी केंद्र शासनाच्या

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे  यांनी यावेळी केले. लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागात यात्रेचे नियोजन करण्यात आले असून त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोनानगर येथे परिसरातील जवळपास 500 नागरिकांची उपस्थिती होती.

Recent Posts