लातूर जिल्हा

आमदार बाबासाहेब पाटील यांनी विनायकराव पाटलांच्या आरोपांची केली पोल – खोल

महाराष्ट्र खाकी (अहमदपूर) – सध्या राज्यात ED च्या कारवाईचा धुमाकूळ चालू आहे. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने राजकीय नेत्यांनी विकत घेतले याबद्दल ED चौकशी करत आहे. अशाच एका कारखान्याबद्दल लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी नाव न घेता अहमदपूर आणि उदगीर तालुक्यातील खरेदी केलेल्या कारखान्याबद्दल ED चौकशी करू शकते असेल बोलले होते. मग अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी सिद्धी शुगर या आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वर शेतकऱ्यांना फसवल्याचे आणि कारखाना विकत घेण्याच्या कारवाईत मोठा घोटाळा झाला असा आरोप केला होता त्यावर बातम्या प्रसारित झाल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अहमदपूर येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विनायकराव पाटलांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. जुन्या बालाघाटचे संचालक जबाबदार आहेत बालाघाट कारखान्याने १० वर्षांत केवळ ५ लाख मे. टन उसाचे गाळप केले. बारदाणा ज्यादा दराने घेतला. ऊसतोड करार केले नाहीत. त्यास तत्कालीन संचालक जबाबदार होते. त्यामुळे कारखाना दिवाळखोरीत निघाला, असा आरोपही आमदार बाबासाहेब पाटील यांनी केला. 2011 मध्ये केवळ 1 लाख मेट्रिक टन उत्पन्न होणाऱ्या अहमदपूर तालुक्‍यात आज 8 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी आवश्‍यक सिंचन व्यवस्था माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या प्रयत्नातून झाली आहे.

ज्यांना कारखाना चालविण्यास दिला होता, त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 13 कोटी 41 लाख 31 हजारांचे कर्ज काढून ठेवले होते . त्याच्या वसुलीची नोटीस संबंधितांना मिळाली आहे. चांगल्या कारखान्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांनी चालविले आहे दिवाळखोरीत निघालेल्या कारखान्याची 10 वर्षात प्रगती केली. 250 मेट्रिक टन क्षमतेच्या कारखान्यात सध्या 4 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाते. पाच लाख 75 हजार क्विंटल साखर उत्पादित होते. 700 पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. कारखाना दररोज 30 हजार लिटर स्पिरीट अल्कोहोल तत्सम पदार्थाचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. असे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सिद्धी शुगरचे व्यवस्थापक प्रफुल्लचंद्र होनराव, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव उपस्थित होते. सिद्धी शुगर कारखान्यात कुठलीही अनियमितता नाही. असेल तर इतकी वर्ष विरोधक गप्प का राहिले होते त्याचे उत्तर द्यावे. विनाकारण ED च्या चौकशीच्या धमक्या देऊ नये. आपण घाबरत नाही, असे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.

(जाहिरात)

Most Popular

To Top