निलंगा लातुक्यातील विवाह सोहळ्याच्या जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची पालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली दखल

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील केदारपूर येथे लग्नसोहळयातील जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची तज्ज्ञ समिती मार्फत सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या अहवालातून मिळालेली माहिती इतर ठिकाणी पून्हा असा प्रकार घडू नये याची दक्षता

घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी म्हंटले आहे. निलंगा तालुक्यातील केदारपूर येथे विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या 200 हून अधिक वऱ्हाडींना 22 मे रोजी दुपारी जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या सर्वावर देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रा. आरोग्य केंद्र,निलंगा उपजिल्हा रूग्णालय,जवळगा उपकेंद्र, अबुलगा बु. याठिकाणी उपचार करण्यात आले

आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम असून बहूतांशी रूग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. सदरील घटनेची माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना कळाली तेव्हा त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखील पिगळे यांना तातडीने संपर्क करून सर्व रूग्णांची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांना स्वत: लक्ष देऊन उपचार यंत्रणा राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यासोबतच लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रदेश सचिव अभय साळुंके यांना रूग्णालयात भेट देऊन रूग्णाची माहिती घ्यावी,नातेवाईकांना धीर दयावा अशा सुचनाही दिल्या होत्या. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या

सुचनेनुसार जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांनी सर्व रूग्णांची वर्गवारी करून त्यांना गरजे प्रमाणे वेगवेगळया रूग्णालयात पाठवून उपचार केले. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रदेश सचिव अभय सांळुके व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णाच्या प्रकृतीची व रूग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली आणि नातेवाईकांना धीर

दिला. एकुण घटनाक्रमाची माहिती त्यांनी पालकमंत्री देशमुख यांना दिली. जिल्हयातील यंत्रणेने आपातकालीन परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळल्याबद्दल पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरील घटनेची विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचीकीत्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य

अधिकारी डॉ. वडगावे यांची ञिसदस्यीय समिती नेमूण सखोल चौकशी करावी व अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. हा अहवाल भविष्यात इतर ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून मार्गदर्शक ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Recent Posts