RSS च्या बाहुपाशात गेलेल्या राज ठाकरेंनी उद्या संघाची चड्डी घातली तर नवल वाटणार नाही – रविकांत वरपे

महाराष्ट्र खाकी ( पुणे) – महाराष्ट्राचे बहुरूपी नेते राज ठाकरे हे संघाच्या पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते. 370 कलम, काश्मीर पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुद्दे आहेत. जे राज ठाकरे भाषणातून मांडत आहेत. शरद पवार

साहेब हे जातीयवादी नेते, देव धर्म मानत नाहीत, एका धर्माचे लांगुलचालन करीत आहेत, हा प्रचार संघ गेली गेली अनेक दशके पवार साहेबांच्या विरोधात करत आहे. आज फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून मांडत आहेत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट ही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही. कारण राज ठाकरे हे संघाच्या बाहुपाशात गेलेले नेते आहेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी वेक्त केले

Recent Posts