महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता लातूरकरांनी सतर्क होऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – पालकमंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्रात आणि लातूर जिल्ह्यातही पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क होऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन मी करत आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातीलही नव्याने कोरोना रुग्ण सापडल्याचे दिसून

आले आहे, त्यामुळे जनते पुन्हा सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातीलही नव्याने कोरोना रुग्ण सापडल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे जनते पुन्हा सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असंख्य नागरिकांना आपला जीव

गमवावा लागला होता, त्यातुलनेत कोरोनाच्या तिसऱ्या
लाटेत मृत्यूच्या घटना कमी घडल्या असल्या तरी आता नव्याने सुरु झालेल्या चौथ्या लाटेत नेमके काय घडेल याचा अंदाज आत्ताच येणार नाही , त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्याला कोरोना होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळलेले योग्य राहणार आहे. बाहेर

जाहिरात

पडताना प्रत्येकाने पुन्हा अनिवार्यपणे मास्कचा वापर
करावा, हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा नित्यनियमाने वापर करावा, ज्या नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही त्यांनी ती ताबडतोब घ्यावी, ज्यांचा तिसरा (बूस्टर ) राहिला आहे त्यांनी तो ताबडतोब घेऊन स्वतःला सुरक्षित बनवावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित

देशमुख यांनी लातूरकरांना केले आहे. प्रशासन, पोलीस
आणि आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती कार्यवाही करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली. कोरोना न होणे हाच कोरोनावर सर्वात महत्वाचा उपचार आहे असे पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले.

Most Popular

To Top